कर्नाटक सरकारने सीमाभागात चालवलेली दडपशाही हा दहशतवादच असून केंद्र सरकारने सीमावादात हस्तक्षेप करावा व २० लाख मराठी भाषकांचा सीमाभाग केंद्रशासित घोषित करून प्रशासक नेमावा अशी मागणी शिवसेनेने काल केली. खासदार संजय राऊत यांनी येळ्ळूरमधील दडपशाहीचा निषेध करताना ही भूमिका मांडली. या दडपशाहीचा निषेध करणारा ठरावही महायुतीने केला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, येळ्ळूर आणि बेळगाव जिल्ह्यातील इतर गावांमध्ये काल तणावपूर्ण शांतता होती. सीमाभागात काल बंद पाळण्यात आला.