पाकिस्तानात आत्मघाती बॉंब हल्ल्यात ५५ ठार

0
91

भारत-पाकिस्तान वाघा सीमेनजीक पाकिस्तानच्या हद्दीत कार आत्मघाती बॉंबहल्ल्यात किमान ५५ जण ठार व २०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आला.वाघा सीमेजवळील पार्किंग विभागात हा हल्ला झाल्याची माहिती पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने दिली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सीमेनजीक ध्वज उतरण्याच्या कार्यक्रमावेळी हा हल्ला झाला. या हल्ल्यात जवळ असलेली दुकाने, इमारती उध्वस्त झाल्या. अमृतसर व लाहोर या शहरांना रस्त्याने जोडणारी वाघा हा एकमेव सीमा मार्ग आहे.
भारताच्या बाजूनेही अती दक्षतेचा इशारा
दरम्यान, या बॉम्ब स्फोटाच्या घटनेनंतर भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारताच्या बाजूने सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्यांना अती दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतातील अत्तारी येथून पाकिस्तानच्या हद्दीत दोन कि. मी. अंतरावर वरील बॉम्ब स्फोट झाल्याचे सीमा सुरक्षा दलातर्फे सांगण्यात आले.