लेख

22-02-12

- दिलीप बोरकर

गोवा राज्यातील चाळीस विधानसभा मतदार संघांसाठीच्या निवडणुकांचे सर्व सोपस्कार पूर्ण झालेले आहेत. राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्षांनी आपआपल्या कुवतीनुसार ‘जिंकणार्‍या’ उमेदवारांची निवड करून अथवा ‘सौदेबाजी’ करून संबंधित मतदारसंघात त्यांची पाठवणी केली आहे. आता पक्षांची लाज राखण्यासाठी म्हणा किंवा भविष्यातील ‘कमाई’कडे नजर लावून म्हणा, उमेदवार साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून आपल्या बाजूने मते खेचण्यासाठी धडपडणार आहेत. येनकेन प्रकारेण निवडून येणे हेच एकमेव ध्येय त्यांच्या दृष्टीपंथात असल्याने त्यांच्या ‘मर्कटलीलां’कडे लक्ष देण्यात अर्थ नाही. त्यांना उमेदवारी बहाल केलेल्या पक्षांकडे त्यासाठी वक्रदृष्टीने पाहण्याचेही कारण नाही, कारण हे पक्ष नव्हेत तर, राजकारणाचा धंदा करण्यासाठी एकत्र आलेल्यांच्या टोळ्या आहेत, असे या अगोदर याच सदरात म्हटलेले होते. आता तर या सर्वच्या सर्व पक्षांचा कारभार पाहता, हे पक्ष नसून ‘पक्ष्यांची घरटी’ आहेत असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

21-02-12

- डॉ. वासुदेव राजेंद्र देशप्रभू, पेडणे.

सध्या सार्वजनिक लेखा समितीच्या विरोधी पक्ष नेत्यांनी तयार केलेल्या अहवालाबद्दल, तसेच न्या. शहा आयोगाच्या अहवालाबद्दल अंदाज बांधले जात आहेत. आम आदमीने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याची वेळ आली आहे हे निश्‍चित.

20-02-12

- रमेश सावईकर

गोवा राज्य विधानसभेची निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. ४० मतदारसंघातून २१५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले असून आपले राजकीय नशिब ते अजमावित आहेत. ३ मार्च रोजी होणारी ही निवडणूक लोकशाहीचा विचार करता, ऐतिहासिक ठरायला हवी. तथापि, ती तशी ठरेल असे कोणी छातीठोकपणे सांगू शकणार नाही. गोव्यात ‘राजकीय परिवर्तन’ झाल्याशिवाय लोकशाही राज्य खर्‍या अर्थाने येण्याची शक्यता नाही. हे परिवर्तन कोण घडवणार? मतदारराजा की त्याच्या सहाय्याला आणखी कोण आहे? असा यक्षप्रश्‍न उभा राहतो.

18-02-12

- शंभू भाऊ बांदेकर

कृष्णाजी अनंत सभासद यांनी तीनशे वर्षांपूर्वी ‘श्री शिवछत्रपतींचे चरित्र’ हे शिवाजी महाराजांवर लिहिलेले पहिले चरित्रात्मक पुस्तक होय. या पुस्तकातील परिशिष्ट -२ मध्ये म्हटले आहे की, परवापरवापर्यंत ६ एप्रिल १६२७ हीच शिवाजी महाराजांची जन्मतारीख प्रमाण मानली जात होती. पण सर्व नव्या पुराव्यांच्या आधारे आता शिवाजी महाराजांची जन्मतिथी फाल्गून वद्य ३ शके १५५१ हीच निश्‍चित करण्यात आली असून दिनांकाप्रमाणे ही १९ फेब्रुवारी १६३० ही ठरते. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना अजूनही तारखेबाबत घोळ निर्माण केला जातो, म्हणून हा खुलासा. ज्या महाराष्ट्र राज्यात शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या महाराष्ट्रानेही १९ फेब्रुवारी हीच जन्मतारीख पूर्ण अभ्यासाअंती निश्‍चित केल्यामुळे निदान यापुढे तरी हा घोळ होऊ नये हीच अपेक्षा.

17-02-12

- दीपक विष्णू फडके, आंबेगाळ, पाळी

स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर भारताच्या जडणघडणीत अगणित संख्येने महाराष्ट्रातील नेत्यांचे योगदान राहिले आहे. टिळक, गोखले, फडके, सावरकर यांच्या युगाने भारतात स्वातंत्र्याची ज्योत पेटविली. त्या युगाचे साक्षीदार व त्यानंतरच्या स्वातंत्र्य भारताच्या मंत्रिमंडळातील हर टप्प्यावरील सहकारी म्हणजे देशाचे पहिले वीजमंत्री काकासाहेब गाडगीळ, पहिले सभापती कै. गणेश वासुदेव तथा दादासाहेब मावळंगकर, देशाच्या नियोजन आयोगाचे मार्गदर्शक डॉ. धनंजयराव गाडगीळ, राजकीय निपुण स. का. पाटील...! अशा या अस्सल मराठी फौजेत कै. नरहर विष्णु गाडगीळ ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे स्थान काही वेगळेच होते.

16-02-12

- प्रा. विनय ल. बापट, ताळगाव.

सध्या गोव्यासह उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे, तर मणिपूर, उत्तराखंड, पंजाबमधील निवडणूक धुरळा अजूनही खाली बसलेला नाही. या राजकीय धामधुमीत राजकारणाची हिडीस, ओंगळवाणी, किळस आणणारी अशी अनेक रूपे आपल्यासमोर येत आहेत. कालपर्यंत एका पक्षात असलेला आज दुसर्‍या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित होत आहे. धनशक्ती आणि गुंडशक्ती असणे ही उमेदवारी मिळविण्याची आज प्राथमिक पात्रता असल्याचे दिसत आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती ही आजच्या राजकारणात भूषणावह गोष्ट ठरत आहे. सर्वच राजकीय पक्ष धनदांडगे, बाहुबली, गुन्हेगार अशा लोकांनाच आपले उमेदवार म्हणून जनतेसमोर आणत आहेत. असे करण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे, सर्वच राजकीय पक्ष ‘निवडून येणे’ हा उमेदवारी देण्याचा एकमेव निकष वापरीत आहेत. अशा लोकांची संख्याही प्रत्येक पक्षात वाढत असल्यामुळे व सर्वांनाच ‘निवडून येण्याची खात्री’ वाटत असल्यामुळे एकाला तिकीट दिल्यास बाकीचे बंडखोरी करताना दिसतात, किंवा उपर्‍यांना तिकिटे मिळत असल्यामुळे त्या - त्या मतदारसंघातील काही निष्ठावान कार्यकर्तेही बंड करताना दिसतात. पण या सर्व किळसवाण्या प्रकारांमुळे आपल्या लोकशाहीचे मात्र दुर्दैवाने चांगलेच ‘वस्त्रहरण’ होत आहे.

16-02-12

- दिलीप बोरकर

अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे २८ वे अधिवेशन याच महिन्याच्या १७ तारखेला म्हणजे परवापासून मुंबईत भरत आहे. देशभर विखुरलेल्या कोंकणी भाषकांची ही परिषद असून त्या निमित्ताने गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र राज्यातील कोंकणी लोक एकत्र येणार आहेत. १७ ते १९ फेब्रुवारीपर्यंत निरनिराळ्या विषयांवर चर्चा करणार आहेत. त्या चर्चेची कल्पना आमंत्रण पत्रिकेवरील वेगवेगळ्या विषयांवरून येते. परिसंवादातील या विषयांकडे पाहता, मागच्या परिषदेप्रमाणेच चर्वण होऊन तीन दिवसांच्या या वार्षिक सोपस्काराचे सूप वाजेल यात शंका नाही. १९४२ साली याच मुंबईत परिषदेचे तिसरे अधिवेशन झाले होते. त्या परिषदेचे स्वागताध्यक्ष होते, वामन रघुनाथ वर्दे वालावलीकर म्हणजेच शणैं गोंयबाब! शणैं गोंयबाबनी कोंकणी माणसाला स्वाभिमान शिकवला. कोंकणी माणूस म्हणजे ‘बाबत कुळं’ नव्हेत असे सांगून शणैं गोंयबाबनी कोंकणी माणसाचा आत्मा जागवला आणि त्याचीच परिणती म्हणून आज गोव्याला कोंकणी राज्याचा दर्जा मिळाला, हे सत्य कोणी नाकारू शकणार नाही. तरीसुद्धा आज त्याच गोव्यात कोंकणी भाषेची जी काय अवस्था झालेली आहे, ती पाहिल्यास २०१२ मधील २८ वी परिषद आणि १९४२ साली झालेली ३ री परिषद यात कुठल्याच प्रकारचा फरक असेल असे वाटत नाही. फरक असलाच तर, ७० वर्षांअगोदरच्या परिषदेच्या स्वागताध्यक्षांच्या दृष्टीसमोर एक निश्‍चित ध्येय होते, मात्र आज आयोजकच गोंधळलेल्या अवस्थेत चाचपडत आहेत.

14-02-12

- कॅजिटन परेरा

‘विधानसभेमध्ये मी निवडून आलो नाही तर समस्त गोवेकरांचे भले कसे होणार?’ हा प्रश्‍न निवडणुकीला उभे राहाणार्‍या हर एक उमेदवाराच्या मनात असतो. पूर्वीही होता व आता तर तो अधिक जोरकस आहे. दुसर्‍याबद्दल म्हणाल तर उमेदवारांच्या मनातील खळबळ अशी...‘तो काय करणार विधानसभेत जाऊन? असल्याने गेल्या दहा वर्षांमध्ये तरी काय दिवे लावलेत? तो लोकांचा नव्हे तर स्वतःचा विकास करणार ना?’ १९६३ नंतर दर पाच वर्षांनी निदान ९ ते १० निवडणुका आल्या अन् गेल्या. पूर्वीच्या विजयी आमदारापेक्षा आपण आपला मतदारसंघाचा कसा चौफेर विकास यावेळी करू ह्याच्या गमजा नवीन उमेदवार मारणार. अशा तर्‍हेच्या वागण्यामुळे विकास म्हणजे नक्की काय हवे आहे सामान्यजनांना? गेल्या पन्नास वर्षांचा साक्षीदार म्हणून सांगतो....रस्ते आले, वीज गावागावात पोहोचली, नळ घरोघरी जोडले गेले, शाळा बांधण्यात आल्या, पाच गावांमध्ये कोठेतरी सरकारी इस्पितळे आली, पोस्ट ऑफिसे, बँका गावागावात पोहोचल्या. रेल्वे आणि मोठमोठे महामार्ग गोव्यातून धावू लागले. यावर सुद्धा विकास झाला नाही असे कसे म्हणता येईल? गोव्यातील टोकावरच्या आजूबाजूला असलेल्या गावातून सकाळी सात वाजता बसेस धावू लागतात आणि रात्री सात ते आठ वाजेपर्यंत माघारी येतात. विकासासाठी आता उरले आहे तरी काय? मासेवाले, भाजीवाले, फेरीवाले आणि हमालसुद्धा खिशामध्ये मोबाईल फोन ठेवून फिरतात. यापेक्षा आणखी विकास तो कोणता? यासाठी विकासाच्या दिशा आता बदलल्या आहेत आणि त्या नवीन उमेदवारांना निश्‍चितपणे माहीत असावयास हव्यात.

13-02-12

- रमेश सावईकर

येत्या ३ मार्च २०१२ रोजी होणारी गोवा राज्य विधानसभा निवडणूक राजकीय पक्षांची कसोटी ठरविणारी असेल, अशी स्पष्ट चिन्हे आता दिसू लागली आहेत. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षात धुमसत असलेल्या अंतर्गत धुसफुशीला तोंड फुटले आहे. सत्तेसाठी हेवेदावे, दावेगिरी, राजकीय कार्यकर्त्यांकडून दबावतंत्राचा वापर, उमेदवारी-तिकीटासाठी कार्यकर्ते-समर्थक यांचे शक्तीप्रदर्शन, एकमेकांची उणी-दुणी वेशीवर टांगण्यासाठी लागलेली अहमहमिका.... सारे सारे काही मतदारांना उघड्या डोळ्यांनी पहात राहण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही.

11-02-12

- दत्ता भि. नाईक.

डिसेंबर १९७० मध्ये सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत शिबिर भरले होते. तेथे रत्नाकर एका गणाचा शिक्षक होता. माझा समवयस्क, नुकतेच मिसरूड फुटलेला, पण तरीही तो गणशिक्षक झालेला. स्पष्ट आवाजात आज्ञा देत होता. त्याची नजर सर्वत्र भिरभिरत होती. गणातील सर्वजणांवर त्याचे असलेले नियंत्रण पाहून एखादा सेनाधिकारीही ओशाळला असता. तेव्हापासून आमची गट्टी जमली ती आजतागायत घट्टच आहे.