आयुष

21-02-12

- डॉ. सीताकांत घाणेकर

लहानणापासून संस्कार वर्गात शिकवले जाते- ‘सत्य बोला, खोटे बोलू नका’- कारण सत्य बोलणे हे पुण्यकर्म व खोटे बोलणे म्हणजे पापकर्म. त्याप्रमाणे अनेक सत्यवादी व्यक्ती वागतात देखील. पण जगात नजर फिरवली तर अनेक वेळा, अनेक व्यक्ती खोटे बोलताना दृष्टिक्षेपात येतात. ह्या घटना विविध क्षेत्रात घडतात. काही उदाहरणे म्हणजे- राजकारण, कोर्ट, आयकर भरणे वगैरे.

21-02-12

- प्रा. रमेश सप्रे

तसा तो आमच्या शाळेत उशीराच आला. म्हणजे नववीत. पण त्यापूर्वी त्याला घेऊन त्याचे आईवडील समुपदेशनासाठी आले होते. खोलीत प्रवेश करतानाच त्याची आई गरजली, ‘हा सारखी पुस्तकं वाचत असतो. याला जरा अभ्यास करायला सांगा.’ त्यावेळीच एकूण प्रकार लक्षात आला की समस्या तो विद्यार्थी नसून मातोश्री होत्या. कारण सोबत आलेले पिताश्री थंड, शांत, खोल, गंभीर - एखाद्या डोहासारखे. तोंडातून शब्द सोडाच पण त्यांच्या चेहर्‍याची रेषाही हल्ली नाही. कोणतीही प्रतिक्रिया नसणं हे खरंच खूप अवघड असतं. पण या महाशयांना ते छान जमलं होतं. आईची मात्र अखंड तक्रारीच्या सुरात बडबड. मुलगा काहीसा त्रासलेला, वैतागलेला. आई जरा शांत झाल्यावर म्हटलं, ‘तुम्ही दोघं जरा बाहेर थांबलात तर मला मुलाशी बोलता येईल.’ ते गेले बाहेर अन्...

14-02-12

- डॉ. सीताकांत घाणेकर

जगात अनेक संस्कृती होऊन गेल्या. त्यातच आपली भारतीय संस्कृती, विविध संस्कृतींमध्ये एक उत्कृष्ट अशी संस्कृती. आपल्या संस्कृतीत महान तत्त्वज्ञान आहे. जे पुष्कळ ग्रंथांमध्ये सामावलेले आहे. वेद, उपनिषदे, मनुस्मृती, योगशास्त्रात... एवढेच नव्हे तर पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या मुखारविंदातून अर्जुनाला मार्गदर्शक असे कुरुक्षेत्रावर सांगितलेलं तत्त्वज्ञान म्हणजेच श्रीमद्भगवद्गीता देखील आहे.

14-02-12

- प्रा. रमेश सप्रे

‘ऋतुचक्र’ नावाचं दुर्गा भागवतांचं एक अप्रतिम पुस्तक आहे. वर्षाच्या बाराही महिन्यातील निसर्गाचं पैलूदार वर्णन करताना त्यांनी प्रत्येक महिन्याच्या प्रकरणाला सुंदर समर्पक नाव दिलंय. त्यातलंच एक ‘सोनेरी अश्‍विन’. कल्पना फारच सुरेख आहे. आषाढात पाऊस सुरू झाला की पेरणी होत शेताशेतातून. पिकं वाढू लागतात. गणपतीच्या माटोळीला शेतात उभ्या असलेल्या भाताची कणसं बांधली जातात. नंतर पाऊस ओसरून उन्हं तापायला लागतात. ‘देवाजीने करुणा केली| शेते पिकुनी पिवळी झाली॥ असं म्हणणारे बाकीबाब (कविवर्य बा.भ.बोरकर)एक प्रकारे शेतात उभ्या असलेल्या पिकलेल्या भातांचं म्हणजेच पिवळ्या सोन्याचं श्रीसूक्तच म्हणत असतात. तर आश्‍विन सुरू झाला की दिवसा कापायला आलेली शेतातली लक्ष्मी, रात्री कोजागरीच्या पूर्ण चंद्राच्या दिशेनं सुरू असलेली प्रकाशाची वाटचाल...सारं कसं सोनेरी दिसतं! केवळ रंगरूपानं नाही तर प्रत्यक्ष वैभवसमृद्धीच्या दृष्टीनं सुद्धा.

07-02-12

- डॉ. सीताकांत घाणेकर

जगातील प्रत्येक माणसाला आपल्या कर्माप्रमाणे फळ मिळते. सत्कर्माचे फळ चांगले व दुष्कर्माचे फळ वाईट हा निसर्गाचा सिद्धांत आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने दक्षतेने कर्म करायला हवे व आपले चारित्र्य घडवायला हवे. ह्या जन्मातील आपले प्रारब्ध चांगले आहे. ह्याचे कारण म्हणजे अनेक जन्माचे संचित कर्म. हे सत्य सुज्ञ मानवाने कधीही विसरता कामा नये. पण दुर्भाग्याने अनेक व्यक्तींच्या बाबतीत अनेक वेळी असे घडत नाही. उलट पूर्वसुकृतामुळे जी विद्या, संपत्ती किंवा सत्ता त्यांना मिळते त्यामुळे ते स्वार्थी व उन्मत्त बनतात. ते अधर्माने वागतात. इतरांवर अत्याचार करतात. कारण कर्मसिद्धांताची त्यांना विस्मृती होते. अशा घटना विश्वात आजच नाही तर इतिहासात देखील प्रत्येक युगात अनेक वेळा दिसतात.

07-02-12

- प्रा. रमेश सप्रे

‘‘माझ्या नावाचं स्पेलिंग ‘एन् ओ ओ पी यू आर्’ असं करा हं .. अन्‌‌ हिंदीत लिहिताना ‘नू’ दुसरा व ‘पु’ पहिला बरं ...’’ आईवडलांच्यामध्ये बसलेल्या एका चिमुकल्या चानीनं (खारोटीनं) उठून सांगितलं. मी प्रवेश यादीत तिचं नाव लिहित होतो. तिचे बाबा प्रवेशअर्ज भरत होते.. आई अकारण अस्वस्थ नि ही निर्धास्त..बिंधास!

31-01-12

- डॉ. सीताकांत घाणेकर

जगात हरतर्‍हेच्या व्यक्ती आहेत. त्यात काही सज्जन तर काही दुर्जन. बहुतांशी असे दिसते की कोणत्याही कारणास्तव दुर्जन लगेच एकत्र येतात. एकमेकांना सहकार्य करतात. पण सज्जन एकत्र येतीलच याची सहसा खात्री नसते. त्याला कारणे अनेक असतात. सज्जन सत्यमार्गाने जाऊन धर्माचे पालन वेळोवेळी करण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी सत्य, धर्म ह्या तत्त्वांचा अतिरेक होतो. त्यामुळे अनेक वाईट घटना घडत असताना सुद्धा तथाकथित सज्जन त्या घटनेविरुद्ध आवाज उठवीत नाहीत. तेव्हा दुर्जनांचे बळ वाढते. ते आणखी अत्याचार करतात. म्हणूनच सत्य, धर्म ह्यांसारखी तत्त्वे अंगीकारीत असताना आपल्या ‘‘भ्रांत धर्माचा’’ इतरांना त्रास होत नाही ना, आपल्या तत्त्वांमुळे काही विपरीत घडत नाही ना ह्याचा विचार प्रत्येक सज्जनाने करायला हवा. पण सहसा असे घडलेले दिसत नाही.

31-01-12

- प्रा. रमेश सप्रे

‘अरे, जरा सोडव रे हिच्या हाताची ही पकड!’ असं म्हणताना आश्‍चर्य वाटायचं.. एवढासा हा जीव, पण कुठून शक्ती येते एवढी? एक नवी आलेली पाचवीची छोटीशी मुलगी इतका घट्ट हात पकडायची की कधी कधी शिपायाची मदत घेऊन तिची पकड सोडवावी लागे. गंमत म्हणजे ही पोर रडायची.. पण केव्हा? शाळेत येताना नव्हे, तर शाळेतून जाताना!

24-01-12

डॉ. सीताकांत घाणेकर

अनेकवेळा आपण सहज म्हणतो- ‘‘व्यक्ती तितक्या प्रकृती’’. पण कुणीही सहसा या म्हणींवर विचार करत नाही. पण सखोल चिंतनानंतर यातील सत्य लक्षात येते. जगातील सर्वत्र घडणार्‍या घटनांकडे नजर टाकली तर कळते की ही म्हण खरीच आहे. कुठल्याही एका विषयावर एकमत होणे फारच कठीण. कधी कधी अशा घटना एकदम सामान्य असतात तर इतर वेळा फार गंभीरसुद्धा असतात. कित्येकवेळा अशा वागण्याचा परिणाम भयंकर होतो.

24-01-12

- प्रा. रमेश सप्रे

‘दे कम बाय् अपॉइंटमेंट’ नावाचं एक पुस्तक आहे. डॉ. जॉर्ज साव्हा या लेखकाचं. इंग्लंडमधल्या या प्रसिद्ध शल्यविशारदाचं (सर्जनचं). त्याच्याकडे पेशंटना अपॉइंटमेंट मिळणं हे एक कठीण काम असायचं. असेही काही रुग्ण यायचे, केव्हाही-कुठेही भेटायचे, पण त्यांना पाहून त्यांच्यावर त्वरित शस्त्रक्रियाही करावी लागे. अशा ‘डिव्हाइन अपॉइंटमेंट’नं जीवनात भेटलेल्या रुग्णांच्या मांचकारी कहाण्या या पुस्तकात आहेत. अनय आमच्या जीवनात असाच आला. अगदी अनपेक्षितपणे. पण काही काळ त्यानं काही शिक्षकांचं जीवन व्यापून टाकलं. खूप काही शिकवलं. अन् जीवनाची पौर्णिमा होण्यापूर्वीच...