अंगण

20-02-12

- प्रमोद आचार्य

काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ कॉंग्रेस पुढार्‍याला भेटलो. कॉंग्रेसने तिकिटे जाहीर केल्यावर सगळीकडे घराणेशाहीच्या नावाने आरडाओरड चालू होती. पक्ष प्रत्येक दबावाला आणि प्रत्येक घराण्यापुढे वाकला अशी कडवी टीका होत होती. अशावेळी कॉंग्रेसचे हे केंद्रीय नेते मला भेटले.

13-02-12

- डॉ. सोमनाथ कोमरपंत

भारतीय प्रबोधनकालाचे एक शिल्पकार म्हणून स्वामी विवेकानंदांचे नाव अभिमानाने घेतले जाते. त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व देशबांधवांना निरंतर स्फूर्ती देणारे आहे. सार्‍या जगाला मानवतेचा दिव्य संदेश देणारे आहे. खडतर कालखंडात त्यांनी विवेकनिष्ठेच्या बळावर भारतीय अस्मितेला आकार दिला. राष्ट्रतेजाचा स्फुल्लिंग जागविला. त्यांच्या अमोघ वाणीत मनुष्यमात्राला भावमंत्रित करण्याची शक्ती होती. तिच्यातील विजिगीषू जीवनप्रणाली किंकर्तव्यमूढ देशबांधवांना दीपस्तंभाप्रमाणे अभ्युदयाची दिशा दाखविणारी होती.

06-02-12

- डॉ. प्रमोद पाठक

या वर्षी भारताच्या प्रजासत्ताकाला ६२ वर्षे पूर्ण झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यावेळच्या घटना समितीने निवडणूक प्रक्रिया, मंत्रिमंडळ, राज्यकारभार इ. विषयांवर निरनिराळी मतमतांतरे लक्षात घेऊन आणि राज्यकारभार सुनियंत्रित, स्वच्छ आणि कार्यक्षमतेने चालावा यासाठी मोठ्या प्रमाणावर चर्चा घडवून आणली आणि १९५० मध्ये घटनासमितीने ती मंजूर करून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले.

30-01-12

- अनिल पै

गोमंतपुत्रांनी कला, साहित्य, शिक्षण, उद्योग, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच अनेक क्षेत्रांत आपल्या ज्ञानाने व विद्वत्तेने जगात कीर्ती मिळवलेली आहे व गोव्याबरोबर भारताचे नाव जगात उज्ज्वल केलेले आहे. त्यांतीलच एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान पद्मभूषण डॉ. जुझे परेरा. प्रकांड पंडित, विद्वान, इतिहास संशोधक, धर्म-संस्कृती व कलेचे अभ्यासक, कोंकणीचे निष्ठावंत भक्त असलेल्या डॉ. जुझे परेरा यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा जो गौरव केलेला आहे तो यथोचितच आहे. तसे पाहू गेल्यास त्यांना हा पुरस्कार यापूर्वीच मिळायला हवा होता.

30-01-12

- कॅजिटन परेरा

सत्तरी तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक जयसिंगराव व्यंकटराव राणे यांना अखेरचा सलाम करण्यासाठी आम्ही काही समाजवादी मित्रमंडळी गेल्या मंगळवारी त्यांच्या अंत्यदर्शनाला जाऊन आलो. त्यावेळी झटकन त्यांचा जीवनपट नजरेसमोर येऊन गेला.

23-01-12

- अजय बुवा

शनिवार १४ जानेवारी व रविवार १५ जानेवारी हे दोन्ही दिवस रसिक गोवेकरांसाठी मंतरलेले व भारलेले होते. कलारसिक ‘गोंयकार’ दोन्ही दिवस शब्दालंकारांच्या झुल्यावर तन्मयतेने डोलला. एका बाजूला निरंतर येणार्‍या मांडवीच्या लाटा आणि दुसर्‍या बाजूला शेर-शायरीच्या आस्वादक लाटा.... एका बाजूला मदमस्त डोलणारी नारळाची झाडे तर दुसर्‍या बाजूला गझलीच्या प्रत्येक शब्दांना दाद देण्याकरिता डोलणार्‍या माना... सगळेच कसे विहंगम अन् मंत्रमुग्ध करणारे.... कारण होते सहावे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन!

23-01-12

- राजय पवार

गझल आणि कोंकणी यांचा संबंध तसा खूप जुना नाही. तरीही कोंकणी भाषेच्या ‘नवायती’ बोलीत या काव्यप्रकाराच्या पहिल्यावहिल्या पावलाचा ठसा नजरेस पडतो. या बोलीतील ‘जिव्रा बजाय’ (१८३५) (म्हणजे प्रवचनांची वही) या भक्तिकाव्य संग्रहात ही कोंकणी आणि पर्शियन शब्दांनी नटलेली गझल वाचायला मिळते. या रचनेस कोंकणीच्या बोलीतील पहिली गझल म्हणता येईल. सदर गझलेत एक बाब लक्षात घेण्याजोगी वाटते, ती म्हणजे, या गझलेतील प्रत्येक मिसर्‍यात गझलकाराने अर्धा मिसरा कोंकणी आणि अर्धा पर्शियन भाषेतून लिहिला आहे. जाणीवपूर्वक केलेला हा प्रयोग लक्षात घेण्याजोगा आहे.

16-01-12

- सौ. पौर्णिमा केरकर

आपल्या प्राचीन संस्कृतीत माणसाच्या भाग्यविधात्या देवदेवतांची जागा पक्ष्यांनी घेतलेली आढळते. नागर असो वा आदिवासी, लोकमानसाच्या धार्मिक श्रद्धेत पक्ष्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. राजस्थानमधील भिल्ल आदिवासी लोकांमध्येही काळ्या रंगाच्या काही पक्ष्यांना देव मानून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. अशा पूजाविधीतून वैयक्तिक आणि समूहमनाच्या भावभावनांना पडताळून शकून-अपशकूनविषयी सजगता दाखविली जाते.

16-01-12

- सौ. लक्ष्मी नारायण जोग

जानेवारी महिना लागला की सर्वांना सर्वात आधी वेध लागतात ते संक्रांतीचे! बहुतेक वेळा संक्रांत १४ जानेवारीलाच येते. पण क्वचित ती १५ जानेवारीलाही येते. यंदा तशीच ती आली आहे. असं सांगतात की, या दिवसापासून दिवस तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्री लहान होत जातात. शेवटी रथसप्तमीच्या दिवशी दिवस व रात्र सारखे होतात. पुढे दिवस मोठा मोठा होतच जातो. उन्हाळा वाढतो. थंडीचे दिवस मार्गशीर्ष म्हणजेच डिसेंबर महिन्यापासून सुरू होतात. कडाक्याच्या थंडीत गोठल्यासारखे होते, तर सुखद थंडीत मन उत्साहित व आनंदीत होते. फळझाडांना मोहोर येऊन पुढे त्यांना फळांचा बहर येणार आहे हे सूचित होते. फुलझाडांना मात्र जास्त थंडी असली की कळ्या कमी येतात. आपल्यात संक्रांतीच्या काळाला ‘पर्वकाळ’ मानतात. म्हणजेच पवित्र काळ! भाविक लोक, साधुसंत मंगलस्नानासाठी पवित्र नद्यांच्या सान्निध्यात जातात व मंगलस्नान करतात. प्रयागसारख्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. तिथल्या पवित्र भूमीला साधुसंतांचा पदस्पर्श होतो.

09-01-12

- रुद्राजी जगन्नाथ शे. केंकरे

भारत सरकारने अलीकडेच अमेरिकेबरोबर अणुकरार केला असून परराष्ट्रमंत्री प्रणब मुखर्जी यांनी भारत सरकारच्या वतीने स्वाक्षरी करून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या अणुकराराची मूळ संकल्पना पूर्व पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी यांची होती. इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत आणि तद्नंतर भाजपच्या कारकिर्दीत जे अणुस्फोट करण्यात आले, त्यामुळे जागतिक संघटनांनी धास्ती घेऊन अणुबॉम्ब बनविण्यास लागणारा अतिमहत्त्वाचा युरेनिअम धातू, त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाची अशी तांत्रिक उपकरणे भारतात उपलब्ध होऊ नयेत म्हणून कोणत्याही देशाने हे अतिशय महत्त्वाचे घटक भारतास देऊ नयेत अशा प्रकारची जागतिक बंदी घातली.