भाजप आघाडी सरकारकडून देश विभाजनाचा प्रयत्न

0
112

>> कॉंग्रेस ः राष्ट्रपतींना निवेदन देणार

गेल्या तीन वर्षांच्या काळात देशात असहिष्णूता वाढत असून गोमांस ङ्ग्रिजमध्ये साठवून ठेवल्याची अफवा एकाचा खून करण्यास पुरेशी झाली आहे. अशा स्थितीत गेली सात दशके कॉंग्रेसने या देशात टिकवून ठेवलेल्या सर्वधर्मसमभाव तत्त्वाचा नाजूक धागा तोडून देशात विभाजन करण्याचा प्रयत्न भाजप आघाडी सरकारने केला आहे. हा धोका लक्षात घेऊन काहीतरी केले पाहिजे, अशा आशयाचे १ लाखांपेक्षा अधिक सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना सादर करण्याचा निर्णय प्रदेश कॉंग्रेसने घेतल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष लुईझिन ङ्गालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
आजपासून पुढील पंधरा दिवसांत वरील सह्या गोळा करण्याची मोहीम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
साध्वी सरस्वतींविरुद्ध
एफआयआर दाखल करा
सरकारच्या वरील धोरणास देशातील विचारवंतांनी विरोध केला होता. त्यामुळेच डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. पानसरे व प्रा. कुलबर्गी यांची उजव्या विचारसरणीच्या लोकांनी हत्या केली. राष्ट्रपती महात्मा गांधी यांचा अवमान करणारी वक्तव्येही सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी साध्वी सरस्वती यांनी गोव्यात येऊन गोमांस खाणार्‍यांना फाशी द्या, असे वक्तव्य केले. त्यामुळे गोवा सरकारने त्यांच्या विरोधात पोलिसांत एङ्गआयआर दाखल करावा, अशी मागणीही फालेरो यांनी केली.