कारापूर येथील विठ्ठल नगरीत शनिवारी मध्यरात्री अज्ञांत चोरट्यांनी एका घराचे कुलूप तोडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी आणखी एका घराचाही दरवाजा खोलून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र अज्ञात चोरट्यांनी संदीप नाईक यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप व कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील मंडळी कार्यक्रमाला गेली होती. ती १२.३० वाजता घरी आली असता हा प्रकार लक्षात आला. अज्ञातांनी घरातील सोन्याच्या साखळ्या, गळसरी, अंगठ्या व इतर मिळून सुमारे १ लाख ६० हजार तसेच ६० हजार रु. किंमतीची दुचाकीही पळवली. एकूण २ लाख २० हजाराचा ऐवज लंपास केला.
तसेच चोरट्यांनी विजयकुमार पित्रे यांचेही घर फोडून चोरीचा प्रयत्न केला. परंतु त्यांना काही सापडले नाही. पोलीसांनी श्वान पथकास पाचारण केले. मात्र काहीच तपास लागलेला नाही. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस निरिक्षक नारायण चिमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलीसांनी अज्ञातांच्या विरोधात भादस ३७९,३८०,४५७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.