मधुमेह असल्यास दातांची व हिरड्यांची काळजी घ्या!

0
172

भारतात जवळ जवळ ४.९ दशलक्ष लोक मधुमेहाने त्रस्त झाल्याची माहिती आही. मधुमेह झाल्यास रक्तातील साखर वाढल्यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. डोळे, शरीरातील नसे, मूत्रपिंडे तसेच हृदयांचे रोग होण्याव्यतिरिक्त दातांचे व हिरड्याचेही विकार होतात. मधुमेह झाल्यास शरीराची प्रतिकारक शक्ती खालावते ज्यामुळे जखम भरण्याची प्रक्रियाही खालावीत (जखम भरण्यास अधिक वेळ लागतो)

आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास त्याची संपूर्ण माहिती डेप्टिस्टला देणे खूप महत्वाचे असते.
– आपल्याला मधुमेह किती वर्षांपासून आहे.
– आपण त्यासाठी कोणती औषधे घेतो.
– रक्तातील साखर तपासल्यास त्याचे रिपोर्ट.
– याच्याव्यतिरिक्त इतर कोणते शारीरिक त्रास असेल तर व त्यासाठी कुठली आषधे घेता ते.
मधुमेहाने पीडित लोकांच्या तोंडात काय दिसेल?
– अनेक किडलेले दात असतील.
– हिरड्यांवचा संसर्ग असेल.
– लाळोत्पादत पिंडांचे त्रास असेल.
– विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन्‌स.
– त्वचा रोग होऊ शकतात.
– चव कमजोर असेल.
मधुमेह असलेल्या रुग्णाच्या तोंडातील अनेक दात का किडतात?
– मधुमहाने पीडित लोकांनी, मधुमेहाचा योगुय तो उपचार चालू केला पाहिजे. व रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात आणली पाहिजे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याव्यतिरिक्त तोंडातील लाळेतही साखरेचे प्रमाण वाढते. याच्या परिणामार्थ तोंडातील जीवाणूंची संख्या वाढून दात किडण्याची समस्या वाढते.
मधुमेह व हिरड्यांचे रोग :
– मधुमेह रुग्णांमध्ये हिरड्याचे संसर्ग व इतर रोग अधिक प्रमाणात आढळून येतात. शरीराची प्रतिकारक शक्ती खालावल्यामुळे हिरड्यांचा संसर्ग होतो व तो झाल्यास त्याच्यामुळे होणारे त्रास सहजपणे कमी होत नाहीत. दातांभोवतीचे हाड निकामी डहोऊन दात सैल होतात व अखेरीस ते गळून पडतात. हिरड्यांनी झालेली इजा भरण्यास लागणारा वेळ मधुमेह रुग्णांमध्ये अधिक असतो. त्यासाठी हिरड्यांची काळजी घेणे अधिक महत्वाचे असते.
दात व हिरड्यांचा त्रास कमी करण्यासाठी काय करावे?
– फ्लोराईड रहित टूथपेस्टने नियमीत प्रमाणे योग्य पध्दतीने दात ब्रश करावेत. व दातांवर साठणारा थर व्यवस्थितपणे साफ करावा.
– थर साफ न केल्यास त्याचा साठा होऊन दातांवर खडा जमा होतो. ६ महिन्यात एकदा डेण्टिस्टकडे जाऊन दात साफ करून घ्यावेत.
– अधिक संरक्षणासाठी माऊथ वॉशचा वापर कारवा.
– मधुमेह रुग्णांनी नियमीतपणे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे. साखर वाढल्यास त्याचा योग्य तो उपचार चालू ठेवावा.
– पौष्टिक व संतुलीत आहार घेणे महत्वाचे आहे.
मधुमेहामुळे आपले तोंड कोरडे का होते?
– तोंडातील लाळ, आपल्या तोंडातील जेवणाचे कण धुवून टाकण्यास मदत करते तसेच तोंडाचा ओलसरपणा कायम ठेवते. मधुमेह रुग्णांमध्ये लाळोत्पादक पिंडे बिघडू शकतात. ज्यामुळे तोंडातील लाळ कमी होते व तोंडात कोरडेपणा वाढतो. तोंडातील ओलसरपणा हरवल्यामुळे तोंडातील मऊ कातींना इजा होऊन त्या जळजळत असल्याचा अनुभव येतो. तोंडातील कात व हिरड्या लाल होऊन दुखापत होते.
तोंडातील लाळ कमी झाल्याने तोंडातील साफ सफाईची प्रक्रिया कमी होते, दात किडू लागतात व श्‍वासाची दुर्गंधीही वाढते.
अशावेळी आपण काय करावे?
डेण्टिस्टला भेटून त्यांनी सुचविल्याप्रमाणे लाळेला पर्याय म्हणून सलाईवा सब्स्टिट्युट वापरावेत त्यांच्या वापराने तोंडातील लाळ वाढते व कोरडेपण कमी होण्यास मदत होते.
– डेण्टिस्टच्या सल्ल्याने फ्लोराईड माऊथ वॉश व फ्लोराईड टूथपेस्टचा वापर करावा. दात निरोगी राहण्यास मदत होते.
– लाळ वाढण्यासाठी साखर नसलेले चिविंगम, मिंट चिविंगम याचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे तसेच लिंबूचा रस पिल्यास सुध्दा लाळ वाढते.
– शक्यतो कॅफेन असलेले पदार्थ व दारूचा वापर कमी करावा.
मधुमेहामुळे होणारे तोंडातील इतर रोग –
१) ओरल कॅण्डिडियासीस-
हे एक फंगल इंफेक्शन असून दातांची कवळी घालणार्‍या लोकांमध्ये अधिक आधळून येते. यासाठी
एण्टी फंगल क्रिम्स व लोशन्स उपलब्ध आहेत. ओरल कण्डिडियासीस न होण्यासाठी आपले तोंड निरोगी ठेवले पाहिजे. दातांची कवळी स्वच्छ धुतली पाहिजे. दात नसलेल्या जागी हिरड्यांना मसाज करून साफ केल्या पाहिजेत.
२) लाईकन प्लेनस –
तोंडात पांढरे पॅचिस होऊन अल्सर होऊ शकतात. मसल्याचे खाण खाल्ल्यास जळजळण्याचा त्रास होतो, असे काही प्रकार आपल्याला लक्षात आल्यास ताबडतोब डेण्टिस्टजवळ जाऊन त्याचा उपचार चालू केला पाहिजे.
मधुमेह रुग्णावर दांतासंबंधित किंवा हिरड्यांची शस्त्रक्रिया करता येते का?
– मधुमेह रुग्णाला संसर्ग होण्याची अधिक शक्यता असल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्वात आधी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणले पाहिजे व शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ते कायम ठेवले पाहिजे.
– साखरेचे प्रमाण नियंत्रणात आल्यानंतर प्रतिजैविक देऊन शस्त्रक्रिया करता येते.
– रुग्णांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतरही तोंडाची खूप काळजी घ्यावी लागते, डैण्टिस्टने सुचवलेली
प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे पाळली तर काहीच समस्या येत नाही.
– संतुलित आहार चालू ठेवला पाहिजे.