पणजीच्या महापौरांनी भिकार्यांविरुध्द कारवाई करण्याची मागणी केल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्याने काल राजधानी शहरातील भिकारी गायब झाले. भिकार्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी काल तीन पथके पाठवली होती. परंतु ते सापडले नाहीत. शहरात फिरणार्या भिकार्यांचे दलाल आहेत. त्यामुळे पोलिसही त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याचा आरोप महापौर फुर्तादो यांनी केला आहे. कार्निव्हल उत्सव जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या वेगवेगळ्या पदपथांवर भिकारी बसत होते. काल ते दिसले नाहीत.