४५ दिवसांत पणजी स्वच्छ, सुरळीत : जिल्हाधिकारी

0
78

भंगारातील वाहनांचा लिलाव; वाहतुकीत बदल
पणजी शहराचा सवर्र्ंकष आराखडा तयार करून पुढील ४५ दिवसांत शहरातील वाहतूक तसेच पार्किंग व्यवस्थेत पूर्ण सुधारणा करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी दिली. शहरात पडून असलेल्या वाहनांची यादी तयार करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकार्‍यांवर सोपविली आहे. वरील सर्व वाहनांचा लिलाव केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत शहर स्वच्छ ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रश्‍नावर महापालिकेचे आयुक्त, पोलीस उपअधीक्षक, नगर विकास प्रशासनाचे संचालक तसेच वाहतूक खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन वरील निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापूर्वी वाहतूक व्यवस्थेत पूर्ण सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासंबंधी वाहतूक पोलिसांनी निर्णय घेतला आहे.