सीएए : गांधींजींच्या म्हणण्याचे आमच्याकडून पालन : मोदी

0
122

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जे सांगितले होते त्याचेच आम्ही पालन करीत आहोत असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी काल सीएएसंदर्भात एका जाहीर सभेत बोलताना केला. सीएए हा कायदा नागरीकत्व देणारा असून नागरिकत्व काढून घेणारा नाही. हा कायदा विचारपूर्वक तयार केला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र विरोधकांकडून याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. कोलकात्यातील बेलूर मठाला भेट देऊन मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ते युवकांना संबोधित करीत होते. सीएएविषयी योग्य माहिती देणे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले त्यांना भारतीय नागरिकत्व द्यायला हवे असे महात्मा गांधी यांनी म्हटले होते. त्याची पूर्तता सीएएद्वारे करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.