सीएए, कलम ३७० मागे घेणार नाही

0
176

>> वाराणशीतील जाहीर सभेत मोदींचे प्रतिपादन

सीएए आणि कलम ३७० च्याबाबतीत सरकारने घेतलेला निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असे नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी येथील जाहीर सभेत सांगितले. कलम ३७० आणि सीसीए हे आवश्यक होते. सरकारवर प्रचंड दबाव असतानाही हे निर्णय घेण्यात आले. यामुळे हे निर्णय कायम राहतील, अशी ग्वाही मोदींनी या जाहीर सभेत दिली.

कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यास आपण सक्षम झालो. कलम ३७० असो की सीएए मोठा दबाव येऊनही सरकारने हे निर्णय घेतले. हे निर्णय यापुढेही कायम राहतील याची ग्वाही देतो, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. दिल्लीतील शाहीनबागमध्ये सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात मुस्लिम महिलांचे दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मुंबई, दिल्लीसह अनेक ठिकाणी सीएएविरोधात मोर्चे आणि आंदोलने करून दबाव वाढवला आहे. तर अनेक राज्यांनीही सीएए लागू करणार नसल्याची भूमिका घेतलेली आङे. या पार्श्वभूमीवर वाराणसीतील जाहीर सभेतून पंतप्रधान मोदींनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सरकार मागे हटणार नाही, अशीच भूमिका याआधी मांडलेली आहे.

राम मंदिराचे प्रकरण काही दशकांपासून न्यायप्रविष्ठ होते. आता मंदिर निर्माणाचा रस्ता मोकळा झाला आहे. सरकारने मंदिर निर्माणासाठी ट्रस्टचीही घोषणा केलीय. यामुळे लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर तयार होईल, असे मोदंनी यावेळी सांगितले.