मुंबई-गोवा महामार्गावर बस अपघातात ५ ठार

0
88

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीतील आसुर्डे गावाजवळ काल पहाटे खासगी बस झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ५ प्रवासी ठार झाले. तसेच २५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या वृत्तानुसार साईपूजा ट्रॅव्हल्सची सदर बस मुंबईहून सिंधुदुर्गकडे येत होती.
पहाटे पाचच्या सुमारास चालकाचा बसवरील ताबा गेला व बस झाडावर आदळली. त्यात ठार झालेल्या प्रवाशांची नावे सुनील गंगाराम कांबळे (शिपोशी, लांजा), सतेज प्रभाकर रेडकर (कांदिवली), महेंद्र महादेव तांबे (राजापूर), सतेज प्रभाकर वेदकर (देवगड) व प्रियांका वेदकार अशी आहे. यापैकी प्रियांका यांच्यावर उपचार चालू असतात त्यांचे निधन झाले.