भारत-पाक विदेश सचिव बोलणी २५ ऑगस्टला

0
107

भारत – पाकिस्तानच्या विदेश सचिवांची बैठक २५ ऑगस्टला इस्लामाबादेत होणार आहे. द्विपक्षीय शांतीवार्ता पुनर्जीवित करण्याच्यादृष्टीने या बोलण्यांकडे पाहिले जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची शपथविधी सोहळ्यानंतर नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर दोन महिन्यांनी प्रथमच दोन्ही देशांत बोलणी होत आहेत. काल दोन्ही देशांच्या विदेश सचिवांनी बोलणी नक्की केली. सीमेवरील पाकिस्तानच्याबाजूने होत असलेल्या घुसखोरी व शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत भारतीय विदेश सचिवांनी नाराजी प्रकट केली. चर्चा सकारात्मक व अर्थपूर्ण होण्यासाठी पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शांतीची अट पाळावी असेही सांगण्यात आले.