भारताने पुढाकार घेतल्यास बोलण्यांसाठी तयार : शरीफ

0
93

भारताशी बोलणी सुरू करण्याकरिता आपण तयार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल सांगितले. सार्क परिषदेसाठी दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. मात्र भारताकहून विदेश सचिव स्तरावरील बोलणी बंद करण्यात आली त्यामुळे भारतालाच पुढाकार घ्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, त्याआधी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीज यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे दोन्ही पंतप्रधानांच्या भेटीच्या शक्यता पुन्हा चर्चेत राहिल्या.