भारताने टी-२० मालिका जिंकली

0
84
दृष्टिहिनांची टी-२० क्रिकेट मालिका जिंकलेला भारतीय संघ.

भोपाळ
कर्णधार अजय रेड्डीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताने तिसर्‍या सामन्यात श्रीलंकेवर २० धावांनी मात करीत दृष्टिहिनांच्या ५ लढतींच्या टी-२० क्रिकेट मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षट्‌कांत ५ गडी गमावत २०९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. भारताचा कर्णधार अजय रेड्डीने नाबाद ८३ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. डी वेंकटेश्वराने ३५ तर दुर्गा रावने नाबाद ३४ धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकन खेळाडूंना २० षट्‌कांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांच्या के. सिल्वाने आपला फॉर्म कायम राखताना ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. चंदना देसप्रियाने ३५ धावा जोडल्या. अजय रेड्डीने २३ धावांत २ बळी मिळविले. त्याचीच सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.
मालिकेतील चौथा सामना २० रोजी लुधियाना येथे होणार आहे.