पाक सैनिकांच्या हल्ल्यात जम्मूत भारताचे २ जवान शहीद

0
212

>> दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४ जखमी

जम्मू भागातील आंतरराष्ट्रीय सीमेलगत पाकिस्तानी सैनिकांनी काल केलेल्या हल्ल्यात एका अजधकार्‍यांसह भारताचे दोन जवान शहीद झाले. उभय सैन्यांच्या लष्कर औपरेशन्सच्या महासंचालकांदरम्यान शस्त्रसंधीबाबत करार झाल्यानंतर एका आठवडाभरात पाकिस्तानी सैनिकांनी काल तोफगोळे व गोळ्याचा भडीमार भारतीय हद्दीतील चौक्यांच्या दिशेने करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
अखनूर विभागातील प्रगवाल भागात झालेल्या हल्ल्यामुळे एका पोलिसासह एक महिला मिळून दहाजण जखमीही झाले. या प्रकारामुळे या भागातील लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाणे भाग पडले.

पाक सैनिकांच्या हल्ल्यात बीएसएफचे एस. एन् यादव व व्ही. के. पांडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी इस्पितळात नेण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. असे लष्करी सूत्रांनी सांगितले. गेल्या महिन्यात पाकच्या अशाच हल्ल्यांमुळे हजारो नागरिकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रयास जावे लागले होते.

श्रीनगरात ३ जवान जखमी
दरम्यान, श्रीनगर जवळील फतेह कदल भागात काल दहशतवाद्यांनी गस्तीवरील सुरक्षा दलांवर हातबॉंब फेकल्याने सीआरपीएफच्या तीन जवानांसह एक महिा जखमी झाली. सर्व जखमींना जवळच्या इस्पितळात हलविण्यात आले. आणखी एक अशाच हल्ल्यात एक जवान व नागरिक जखमी झाला.