पाक सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे २ जवान शहीद

0
97

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या मोठ्या प्रमाणातील उखळी तोफांच्या वर्षावामुळे भारताचे दोन सैनिक शहीद झाले. रायफलमॅन विनोद सिंग व जाकी शर्मा अशी या शहीद सैनिकांची नावे आहेत.
काल संध्या. ५.१५ वा. दरम्यान सुंदरबनी क्षेत्रात पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीत स्वयंचलीत बंदुकांच्या गोळीबारासह उखळी तोफांचा जोरदार मारा केला अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली. त्यानंतर भारतीय लष्करानेही या हल्ल्यात चोख प्रत्त्युत्तर दिले. लष्करी प्रवक्त्याच्या माहितीनुसार विनोद सिंग (२४) हा जम्मू काश्मीरच्या अखनूर जिल्ह्यातील दानापूर या खेड्यातील आहे. तर ३० वर्षीय शर्मा हा जम्मूतील हिरानगर जिल्ह्याच्या सनहेल गावचा आहे. या दोन्ही सैनिकांनी हुतात्मा होण्याआधी आपल्या शौर्याची प्रचिती दिली असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.