कोरोनावरील लस १५ ऑगस्ट रोजी येणार

0
126

>> भारत बायोटेकद्वारे पहिली स्वदेशी बनावटीची लस

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरील आजारासाठी तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस उजत-दखछ ही १५ ऑगस्ट रोजी लॉंच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत बायोटेकने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआरद्वारे ही लस लॉंच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी भारत बायोटेकच्या उजत-दखछ या लसीच्या मानवी चाचणीसाठी मान्यता देण्यात आली होती. आयसीएमआरकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार ७ जुलैपासून मानवी चाचणीसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. यानंतर सर्व चाचण्या योग्यरित्या पार पडल्या तर १५ ऑगस्टपर्यंत ही लस लॉंच करण्यात येईल.
जर प्रत्येक टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली तर १५ ऑगस्टपर्यंत ही लस बाजारात उपलब्ध होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आयसीएमआरकडून सध्या याबाबत केवळ शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारत बायोटेकने कोरोनावरील लस तयार केल्याची सोमवारी घोषणा केली होती. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली कोरोना लस तयार केली होती. त्यानंतर भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने फेज १ आणि फेज २ मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली. एसएआरएस-सीओव्ही -२ स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळे करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले.