गोपनीयतेची ‘बुडती नौका’

0
108

अलीकडेच गुजरातमधील पोरबंदर समुद्र किनार्‍यालगत आलेल्या एका स्ङ्गोटकांनी भरलेल्या नौकेचा तटरक्षक दलाने पाठलाग केला आणि ती बोट रोखली. त्यानंतर या बोटीचा स्ङ्गोट झाला आणि ती समुद्रात बुडाली. या बोटीमध्ये चार जण होत अशी माहिती समोर आली आहे. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही वृत्तपत्रांनी आणि काही राजकीय पक्षांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत आणि त्यावरून सध्या बराच वादही सुरू आहे.सरकार उगीचच पाकिस्तानविषयी खोटे आरोप करते आहे व तसे आरोप करण्यापूर्वी या बोटीत दहशतवादी होते हे सिद्ध करण्याची गरज आहे, असे या सर्वांना म्हणावयाचे आहे. काही माध्यमे आणि राजकीय पक्षाची नेतेमंडळी यांच्याकडून सुरू असलेला हा सर्व प्रकार अतिशय धोकादायक, चिंताजनक आणि अयोग्य आहे. किंबहुना, जी भूमिका पाकिस्तानकडून मांडली गेली असती तीच भूमिका ही मंडळी मांडत आहेत. मागील वर्षी म्हणजे २०१४ मध्ये एलओसीवर ५५० हून अधिक वेळा गोळीबार झालेला आहे. काश्मीर सीमेवर १२० हून जास्त दहशतवादी मारले गेले आहेत. देशामध्ये अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत, तसेच काही हल्ल्यांचे कट उधळून लावले आहेत. इसिसचे ट्वीटर खाते हाताळणारा तरुण आपल्या देशामध्ये पकडला गेलेला आहे. पश्‍चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यामध्ये बॉम्बस्ङ्गोट झालेले आहेत. या सर्व घटना घडत असतानाही काही राजकीय पक्ष आणि काही माध्यमे पाकिस्तान हा एक चांगला देश आहे, त्यावर काही आरोप करण्यापूर्वी आपल्याकडे पुरावा असणे आवश्यक आहे, अशा आशयाची विधाने करत असतील वा तसे सुचवू पाहात असतील तर ते अतिशय गंभीर आहे. अशा प्रकारच्या बातम्या, चर्चा पाहून आपल्या सैन्याच्या, सुरक्षा यंत्रणांच्या जवानांचे मनोबल खचणार नाही का, याचा जराही विचार ही मंडळी करत नाहीत, हे खेदनजक आहे.
पोरबंदरमधील या बहुचर्चित बनलेल्या बोटीच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे आपण देऊ शकतो. समुद्रामध्ये स्ङ्गोटक पदार्थ आहेत की नाही याबाबतची माहिती मिळणे हे अतिशय कठीण काम असते. अशा प्रकारची बोट समुद्रात थांबवली जाते तेव्हा त्यामध्ये असणारे कर्मचारी त्यांच्याकडील बंदुका, रायङ्गली, स्ङ्गोटक पदार्थ तिथूनच समुद्रात ङ्गेकून देतात. परिणामी, अशी बोट पकडी गेली तरी त्यामध्ये काहीही नसल्याचे निष्पन्न होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या बोटी या पूर्णपणे स्ङ्गोटकांनी वा अवैध हत्यारांनी भरलेल्या नसतात. त्यामध्ये मासे, डिझेल किंवा इतर गोष्टींचा समावेश अधिक असतो आणि बोटीच्या गुप्त भागामध्ये ही स्ङ्गोटके दडवली जातात. तस्करी करण्याची ही एक सामायिक पद्धत असते. त्यामुळेच केवळ तस्करी करणारे म्हणजे तस्कर आणि दहशतवादी वेगळे अशा प्रकारचा भेदभाव आपल्याला करता येणार नाही. कारण अनेक तस्कर अङ्गू, गांजा, चरस तसेच स्ङ्गोटक पदार्थ आणि रायङ्गली यांचीही तस्करी करतात. कारण त्यातून त्यांना बराच पैसा मिळतो. गोपनीयतेच्या दृष्टिकोनातूनच कोस्टगार्डनी या कारवाईबाबतची माहिती नौदलाला, गुजरातच्या किंवा इतर पोलीसांना दिली नसेल तर त्यात गैर काही नाही.
या बोटीबाबतची माहिती आपल्याला एनटीआरओ या संस्थेने दिली होती. त्यानुसार, त्यांनी काही संभाषणेही टेप केली होती. त्या संभाषणांमधून अशा प्रकारच्या एका बोटीमधून काही स्ङ्गोटके आणि सामग्री वाहून नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसारच तटरक्षीय दलाने या बोटीला पकडण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय गुप्तचर यंत्रणांनाही अशा प्रकारची माहिती मिळालेली होती. त्यामुळेच या कारवाईबाबत गैर काहीच नाही.
असे असताना पाकिस्तानने ही बोट त्यांची असल्याचा इन्कार केल्याची बातमी काही माध्यमांनी समोर आणली. परंतु, हे धादांत खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बोट पाकिस्तानच्या केटी बंदरातून निघालेली होती. त्या बोटीवर असणार्‍या कॅप्टनच्या आईनेही याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ही बोट तस्करीमध्ये वापरली जात होती, असे सांगितले आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे अलीकडील काळात तस्कर आणि दहशतवादी यांच्या मधील ङ्गरक हा अतिशय कमी झालेला आहे. कारण अनेकदा तस्करांकडून दहशतवाद्यांसाठी शस्त्रास्रे, दारुगोळा आणि यांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्ङ्गोटांसाठी आणण्यात दारुगोळा हा तस्करांकरवी समुद्रमार्गातूनच आणण्यात आला होता, हे विसरता कामा नये. बरेचदा एरवी किरकोळ गुन्हे करणारे गुन्हेगारही काही काळापुरते दहशतवादी कृत्यामध्ये भाग घेतात. दाऊद इब्राहिमनेही अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यांसाठी अशा गुन्हेगारांची मदत घेतली होती. त्यामुळेच तस्कर आहे म्हणून सोडून द्यावे असे धोरण चालणार नाही.
आपल्या सुरक्षा यंत्रणांवर आपण विश्‍वास ठेवणार आहोत की नाही? की आपला पाकिस्तानहून आलेल्या बातमीवर अधिक विश्‍वास आहे? आणि जर तसा असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आणि देशविघातकी आहे. अशा प्रकारे शत्रूराष्ट्राच्या बाजूने झुकणार्‍यांवर आणि त्यांची भलामण करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटले दाखल करण्याची गरज आहे.
पाकिस्तानने आपल्या देशात कितीवेळा हिंसाचार केलेला आहे आणि किती वर्षांपासून केलेला आहे हे जगजाहीर आहे. तरीही अनेक पाकिस्तानीप्रेमी तज्ज्ञ अशा घटनांदरम्यान सामान्य लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण करण्याचे काम का करताना दिसतात? जर ही बोट स्ङ्गोटक पदार्थ घेऊन जाण्याऐवजी केवळ तस्करी करीत होती असे मानले तरीही अशा प्रत्येक घटनेचे भारताच्या सरंक्षण विभागामध्ये विश्‍लेषण केले जाते आणि संबंधित व्यक्तीची वा यंत्रणेची चौकशी करून दोषी असणार्‍यांना शिक्षा दिली जाते. याचे उदाहरण द्यायचे झाले तर कारगीलमध्ये अशा प्रकारचे अतिक्रमण झाले होते त्यामध्ये एका ब्रिगेडियर रँकच्या आणि एका जनरल रँकच्या अधिकार्‍याला काम नीट न केल्यामुळे शिक्षा झालेली आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतरही प्रधान कमिटीने अनेक चुका समोर आणल्या होत्या. त्यावेळच्या सरकारने या चुकांकडे दुर्लक्ष केले हा भाग वेगळा! पण अशा कारवायांदरम्यान घडणार्‍या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींबाबत निःपक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा देशात अस्तित्त्वात असताना माध्यमांना त्या घटनेचा ऊहापोह करून देशाच्या सर्व सुरक्षा यंत्रणांना, गुप्तचर यंत्रणांना, तटरक्षक दलाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची घाई आणि गरजच काय आहे? आपल्याकडे, दहशतवादी हल्ला झाला, माओवादी हल्ला झाला किंवा बांगला देशी घुसखोरीची एखादी घटना घडली की त्याचा उपयोग भारतीय सुरक्षा व्यवस्थांना बदनाम करण्यासाठी केला जातो.
खरे तर अशा महत्त्वाच्या घटनेनंतर संपूर्ण देशाने एकत्र येण्याची गरज असते. तसे न करता, आपल्याच सुरक्षा यंत्रणांवर, पोलिस दलावर, तटरक्षीय दलावर आरोप करून, त्यांच्या कारवाईभोवती संशयाचे वलय निर्माण करून आपण अप्रत्यक्षपणे पाकिस्तानलाच मदत करतो आहोत. काही माध्यमांच्या आणि काही राजकारण्यांच्या या घातकी खेळामुळे पाकिस्तानला पाठबळ दिले जात आहे. त्याचबरोबर देशातील नागरिकांमध्येही अकारण गैरसमज पसरवण्याचे काम होत आहे. त्यामुळे आगामी काळातील सुरक्षेसंदर्भातील वाढते धोके लक्षात घेऊन माध्यमे, राजकीय पक्ष आणि सर्वांनीच जबाबदारीचे भान, तारतम्य बाळगण्याची अतिशय गरज आहे.