कॉंग्रेसच्या धोरणावर चर्चिल आलेमाव नाराज

0
110

भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कॉंग्रेसने समविचारी पक्षांशी समझोता करून ही विधानसभा निवडणूक लढविणे अत्यंत गरजेचे आहे. तसे न झाल्यास गोमंतकीयांना नको असलेला भाजपाच सत्तेवर येईल असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाणावलीचे उमेदवार चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केले. याची कल्पना असूनही कॉंग्रेसने एकला चलोरे केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस गोव्यात तीस मतदारसंघात उमेदवार उभे करील असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दोन वर्षांआधीपासून आपण बाणावली निवडणूक लढविणार असल्याचे कॉंग्रेसच्या नेत्यांना सांगितले होते. कामही सुरू केले. पण आपणावर लुईस बर्जर प्रकरणी आरोप ठेवून आरोपपत्र दाखल केले. भ्रष्टाचाराचा आरोप असल्याने कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी कॉंग्रेसची उमेदवारी देण्यास नकार दिला. पण मुख्य संशयित दिगंबर कामत असून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले असताना त्यांना मात्र उमेदवारी दिली. हा कसला न्याय असा सवाल त्यांनी केला.