काश्मीरमध्ये एनएसजी ः केंद्राचा हुकमी एक्का

0
135
– शैलेंद्र देवळाणकर
काश्मीरमध्ये वाढत गेलेला हिंसाचार लक्षात घेऊन आणि पाकिस्तानचे आगामी काळातील मनसुबे विचारात घेऊन केंद्र सरकारने तेथे एनएसजी कमांडोंना तैनात केले आहे. एनएसजी हा केंद्राचा हुकुमी एक्का आहे. शेवटचा पर्यात म्हणून वापरले जाणारे आयुध आहे…
काश्मीर हा  जगामधील हाय मिलिटराईज्ड झोन म्हणजे लष्कराच्या प्रभावाखाली असलेला प्रदेश अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. या परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा दल आणि ब्लॅक कॅट कमांडोज यांना काश्मीरमध्ये तैनात कऱण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. ही दोन्ही संरक्षण दले काश्मीरमध्ये काऊंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन करत आहेत. पाकिस्तानी दहशतवादी घुसू न देण्याचे काम लष्कराचे आहे, पण जे दहशतवादी आत शिरून दगडङ्गेक करणार्‍यांच्या मागे लपून लष्करावर छुपे हल्ले करतात, त्यांना जागेवर किंवा घरात घुसून मारणे त्याला इन्सर्जन्सी ऑपरेशन म्हणतात. त्यामुळे दहशतवाद विरोधी म्हणजे अँटी टेररिस्ट आणि काऊंटर टेररिझम या दोन्ही गोष्टी निरनिराळ्या आहेत. दहशतवादविरोधी कारवाया या लष्कराकडून होतात, तर प्रतिहल्ला हा एनएसजीकडून होतो. एनएसजी म्हणजे लष्कर नाही. एनएसजी हे ङ्गेडरल एलिट कोअर आहे. काश्मीरमधील नागरी प्रशासनाला काश्मिरात घुसलेल्या दहशतवाद्यांकडून होणार्‍या हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे, तो रोखण्यासाठी एनएसजी कमांडोंना पाठवण्यात आले. यापूर्वीही एनएसजी कमांडोज काश्मीरमध्ये जात होते. काही विशेष कामगिरीसाठी त्यांना पाठवले जात असे. पठाणकोट हल्ल्याच्या वेळी एनएसजी कमांडोंना पाठवण्यात आले होते. मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्याच्या वेळीही एनएसजी कमांडोंना पाचारण करण्यात आले होते.
आता काश्मीरमध्ये त्यांची गरज का भासली, हे समजून घ्यावे लागेल. काश्मीरमध्ये न भूतो न भविष्यति असा दहशतवादी हिंसाचार वाढला आहे. त्याची टक्केवारी पहायची झाल्यास २०१४ ते २०१८ या काळात दहशतवादी हिंसाचारात ६४ टक्के वाढ झाली. दहशतवाद्यांचा वाढत चाललेला धोका लक्षात घेऊनच एनएसजी कमांडोंना तैनात करण्यात आले आहे. आत्तापर्यंत दहशतवाद्यांना भिडण्याचे हे काम सीआरपीएङ्गकडून केले जायचे. आता त्यांच्या बरोबरीने मदतीला ब्लॅक कॅट कमांडोज पाठवण्यात आले आहेत.
एनएसजी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड अशा स्वरुपाची ही संकल्पना होती. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि खलिस्तानवादी दहशतवाद उच्च पातळीवर पोहोचला. त्यावेळी लष्कराकडून दहशतवादाचा सामना करण्यास काही मर्यादा आहेत असे लक्षात आले. त्यातूनच मग केवळ दहशतवादाचा सामना करू शकेल अशा स्वरुपाचा विशेष गट किंवा तुकडी तयार करावी असा विचार पुढे आला. कारण काश्मीर आणि पंजाब इथला दहशतवाद देशात इतरत्र पसरायला सुरुवात झाली होती. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने भारताचे तुकडे पाडण्यासाठी छुपे युद्ध सुरु केले. त्या अंतर्गत दहशतवाद्यांना भारतात पाठवायला सुरुवात केली. याचा सामना कसा करायचा या विचारातून १९८६ मध्ये भारतीय संसदेत एक विधेयक आणण्यात आले. त्यातून केंद्राचे नियंत्रण असेल अशी ताकद निर्माण करण्याचे ठरवले. राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर एनएसजीच्या निर्मितीचा कायदा तयार करण्यात आला. त्यामुळे एनएसजी ही एक स्वतंत्र ङ्गोर्स कायद्याने निर्माण करण्यात आली आहे. त्याचे मुख्यालय दिल्लीला आहे आणि त्याचा प्रमुख डी.जी.पी दर्जाचा आयपीएस अधिकारी असतो.  या दलात थेट नेमणूक होत नाही. यामध्ये दोन प्रकारचे अधिकारी नेमण्यात आले आहेत. लष्करातील प्राविण्य मिळवलेले शूरवीर अधिकारी आणि निमलष्करी दले आणि पोलिस यांच्यामधील शूर अधिकारी या गटासाठी निवडले जातात.
एनएसजीमध्ये दोन गट असतात. एकामध्ये लष्करी अधिकार्‍यांचा समावेश असतो तर दुसर्‍यामध्ये पोलिस अधिकार्‍यांचा. लष्करी अधिकार्‍यांचा समावेश असणार्‍या समूहाला स्पेशल ऍक्शन ग्रुप म्हटले जाते; तर पोलिस अधिकारी असणार्‍या दुसर्‍या समूहाला स्पेशल रेंज ग्रुप म्हटले जाते. थोडक्यात थेट एनएसजीमध्ये नेमणूक होत नाही तर अनुभवी कर्तृत्ववान अधिकार्‍यांना निवडले जाते. त्यांचे प्रशिक्षण हरियाणातील मानेसरमध्ये होते. दिल्लीपासून ५० किलोमीटरवर हा परिसर आहे. तिथे ९० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. अत्यंत कठीण प्रशिक्षणानंतर युनिट ५१ आणि युनिट ५२ या २ प्रकारच्या ङ्गोर्सेस तयार केल्या जातात.  युनिट ५१ हा काऊंटर इन्सर्जन्सीमध्ये तरबेज आहे. लपलेल्या दहशतवाद्यांना घरात घुसून मारणे, नागरिकांचे नुकसान कमी करणे यासाठी हा समूह काम करतो. युनिट ५२ हे दहशतवाद्यांनी ज्यांना ओलिस ठेवलेले आहे त्यांना सोडवण्याचे काम करते.
याखेरीज तिसरा समूह म्हणझे हिट म्हणजे एचआयटी. यामध्ये पाच जणांचा समावेश असतो. कारवाईसंदर्भातील अंतिम निर्णय ही समिती घेते. अलीकडच्या काळात महिला कमांडोजचा समावेशही या गटामध्ये करण्यात आला आहे. या गटाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे देण्यात आली आहेत. त्यांच्याकडे काऊंटर इनसर्जन्सीमधे महत्त्वाच्या असणार्‍या स्नायपर रायङ्गल्स आहेत, तसेच रात्रीच्या वेळी हल्ला करण्याचे प्रशिक्षण या जवानांना दिले जाते. त्याचप्रमाणे १९८७ मध्ये एनएसजीमध्ये नॅशनल बॉम्ब डेटा हे एक महत्त्वाचे युनिट निर्माण झाले. दहशतवादी जेव्हा आरडीएक्सने स्ङ्गोट घडवून आणतात, तेव्हा त्याची पूर्ण चौकशी करणे आणि ते बॉम्ब कसे निकामी करता येऊ शकतात याविषयीचे संशोधन करणे हे काम या युनिटमार्ङ्गत करण्यात येते. आतापर्यंत देशात जितके बॉम्बस्फोट झाले त्या प्रत्येकाचा नमुना या नॅशनल बॉम्ब डेटाकडे आहे. यामध्ये प्रेशर कुकर बॉम्ब, सायकल बॉम्ब या सर्वांचे नमुने आहेत. त्यावर संशोधन सुरू असते, तसेच दगडङ्गेक करणार्‍यांना नियंत्रणात आणण्याचे प्रशिक्षणही या जवानांंना देण्यात आले आहे. थोडक्यात, विशेष प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञांचा हा गट आहे.  यामध्ये  सीटीसीसी हा एक कोर्स केला जातो, ज्यामधून अत्यंत सखोल प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारचा गट जर्मनी आणि यूकेमध्ये तयार करण्यात आला होता. इंग्लंडमधील एङ्ग.ए.एस. वरून एनएसजीची संकल्पना पुढे आली.
काश्मीर खोर्‍यात तब्बल ५०० दहशतवाद्यांचा सामना करायचा आहे. या सर्वांना टिपणे महत्त्वाचे आहे. कारण त्याशिवाय जम्मू-काश्मीरात शांतता प्रस्थापित होणार नाही. त्यामुळेच एनएसजी किंवा ब्लॅक कॅट कमांडोंना तैनात आणण्यात आले आहे. हा समूह केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. जोपर्यंत काश्मीरमधील दहशतवाद पूर्णपणे निपटला जात नाही तोपर्यंत चर्चेसाठी योग्य वातावरण निर्मिती होऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानात जुलैमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील शासन-प्रशासन अंतर्गत गोष्टींमध्ये व्यस्त आहे. अशा वेळी लष्कर आणि आयएसआय याचा गैरङ्गायदा घेत काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले करु शकतात. ही वेळ लक्षात घेऊन एनएसजी कमांडो आणण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तो योग्यच आहे.
 एनएसजी हा केंद्राचा हुकुमी एक्का आहे. शेवटचा पर्यात म्हणून वापरले जाणारे आयुध आहे. काश्मीरात शांतता आणि स्थैर्य नांदण्यासाठी  केंद्र सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. एनएसजी कमांडो पाठवण्याचा निर्णय सार्थ ठरला आहे.