काश्मीरमधले नवे आव्हान

0
119
  • शैलेंद्र देवळाणकर

जम्मू-काश्मीरमध्ये सत्यपाल मलिक यांनी नवे राज्यपाल म्हणून कार्यभार हाती घेतला असला तरी ताज्या दोन घटनांमुळे त्यांच्यापुढील आव्हानांमध्ये भर पडली आहे. बकरी ईदच्या दिवशी श्रीनगरमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये इस्लामिक स्टेटचे झेंडे ङ्गडकावले गेले. हा पाकिस्तानचा सुनियोजित कट असून भारताला बदनाम करण्याचा डाव आहे. त्याचा मुकाबला करावा लागेल. ही नक्कीच चिंताजनक बाब आहे.

काश्मिरसंदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये तीन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. या घटना जम्मू काश्मिरच्या शांतता, सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि एकूणच भारताच्या सुरक्षिततेवर परिणाम करणार्‍या आहेत. त्यामध्ये एक घडामोड सकारात्मक आहे. ती म्हणजे जम्मू-काश्मिरमध्ये राज्यपाल म्हणून झालेली सत्यपाल मलिक यांची नियुक्ती. काश्मिरमधील दहशतवादाचा बीमोड करून नागरिकांना सकारात्मक वातावरण आणि सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने केला जाणारा हा सकारात्मक बदल आहे. सत्यपाल मलिक हे बिहारचे माजी राज्यपाल आहेत. जवळपास ५१ वर्षांनंतर पहिल्यांदाच राजकारणात सक्रिय राहिलेल्या व्यक्तीला जम्मू-काश्मीरचं राज्यपालपद देण्यात आले आहे. अन्यथा आजवर नोकरशाही किंवा लष्कराशी संबंधित अधिकार्‍यांचीच या पदासाठी वर्णी लागत होती. मलिक यांनी भारतीय क्रांतीदल, लोक दल, कॉंग्रेस, जनतादल आणि भाजपा असा प्रवास केला आहे. त्यांनी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री या पदांवरही काम केलेले आहे. त्यांच्यापुढे काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आव्हान आहे.

मलिक यांची निवड हा आशेचा किरण मानला जात असला तरी काश्मीरमधील दुसरी घटना राष्ट्राच्या सुरक्षेवर परिणाम करणारी ठरू शकते. बकरी ईदच्या दिवशी श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये इस्लामिक स्टेटचे झेंडे ङ्गडकावले गेले. त्याचबरोबर दगडङ्गेकही मोठ्या प्रमाणात झाली. काश्मिरमध्ये दगडङ्गेक किंवा निदर्शने होणे ही तशी नवीन बाब नाही; मात्र काही महिन्यांच्या अंतराने इसिसचे झेंडे तिथे दाखवले गेले आहेत, ही नक्कीच चिंताजनक गोष्ट आहे. त्यामागचा उद्देश काय आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे.

इस्लामिक स्टेटचे झेंडे यापूर्वीही दाखवले गेले आहेत याचा अर्थ काश्मिरमधून त्यांना समर्थन मिळते आहे असे नाही. उलटपक्षी हा प्रकार केवळ लक्ष विचलित करण्यासाठी केला गेला आहे हे लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तानचे हे सुनियोजित धोरण आहे असे नक्कीच म्हणता येईल. याचे कारण जम्मू काश्मिरमध्ये बहुसंख्य मुस्लिम हे शिया पंथीय मुसलमान आहेत आणि इसिस ही सुन्नी पंथीयांची संघटना आहे. सुन्नी पंथीय देशांमध्ये ती अस्तित्वात होती आणि आता तिचा जोर व प्रभाव कमी झालेला आहे. इराक आणि सीरियामधून या संघटनेची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झालेली आहे. या पार्श्‍वभुमीवर काश्मिरमध्ये इसिसचे झेंडे दाखवले जात आहेत. तथापि, जम्मू काश्मिरमध्ये शिया पंथीय जनता असल्याने ते इसिसला समर्थन देऊ शकत नाहीत. त्यामुळेच हा पाकिस्तानचा कुटिल डाव आहे.

आता प्रश्‍न उरतो तो पाकिस्तानला असे का करायचे आहे? याचे कारण सध्या पाकिस्तानचा जागतिक स्तरावर तयार झालेली आपली कुप्रतिमा बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे. दहशतवादाची निर्यात करणारी ङ्गॅक्टरी म्हणून आज अवघे जग पाकिस्तानकडे पाहिले जाते आहे. पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांना प्रशिक्षित केले जाते ही बाब आता जगज्ञात आहे. तेथे दहशतवाद्यांची प्रशिक्षणतळे असून तिथून प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी जगभर पसरत आहेत. आजवर भारत हीच गोष्ट सातत्याने जागतिक व्यासपीठावर मांडत आला आहे; मात्र त्यावर आंतरराष्ट्रीय समुदाय विश्‍वास बसत नव्हता. पण जानेवारी २०१८ मध्ये खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्वीट करून पाकिस्तान दहशतवादाला कसा समर्थन देत आहे यावर बोट ठेवले. तसेच दहशतावादाला मदत कऱणे थांबवले नाही तर पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवण्यात येईल असा सज्जड दमही त्यांनी भरला होता. अमेरिकेने ही भूमिका घेतल्यामुळे इतर युरोपिय देशही त्याच मार्गाने जाणार आहेत. साहजिकच याचे प्रतिकूल परिणाम पाकिस्तानला भोगावे लागू शकतात. कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या दिशेने प्रवास करते आहे. पाकिस्तानला जगाकडून आर्थिक मदतीची गरज आहे. ही आर्थिक मदत घेण्यासाठी पाकिस्तानला आपली प्रतिमा बदलणे गरजेचे आहे. त्यामुळेच पाकिस्तान आपला देश लोकशाहीला समर्थन करणारा, लोकशाही रुजलेला आणि दहशतवादाची निर्यात न करणारा आहे असे चित्र निर्माण करते आहे. हे करत असताना पाकिस्तान भारताला आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करू पहात आहे. जगात दहशतवादाची निर्यात भारताकडून होते आहे असे चित्र निर्माण करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. त्यासाठीच भारतात इसिसचे समर्थक वाढताहेत असे चित्र निर्माण केले जात आहे. जम्मूकाश्मिरमध्ये हे समर्थक आहेत, असे दाखवण्यासाठी इसिसचे झेंडे दाखवले जाताहेत आणि भारतात आयसिसचा पुनर्जन्म होतो आहे असे चित्र पाकिस्तानकडून तयार केले जात आहे. भारतात पुन्हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना पाय रोवायचा प्रयत्न करताहेत असा कांगावा पाकिस्तानला जागतिक व्यासपीठावर करायचा आहे. त्यामुळेच अशा निदर्शनांमध्ये जाणीवपूर्वक आयसिसचे झेंडे दाखवले जातात.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इसिसच्या रडारवर भारताचा समावेश नाही. भारतीय मुसलमानांनी या दहशतवादी संघटनेला सातत्याने नाकारले आहे. युरोपमधून मागील काळात शेकडोंच्या संख्येने निर्वासित नागरीक इसिसमध्ये जात होते. पण तसा प्रकार भारतात दिसला नाही. आत्तापर्यंत केवळ २५ तरुण इसिसमध्ये गेले असल्याची माहिती पुढे आली आहे. युरोपच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे काश्मिरात आयसिसचे झेंडे दाखवणे ही भारताची बदनामी करण्याचा पाकिस्तानची धूर्त चाल असून एका सुनियोजित रणनीतीचा तो एक भाग आहे.

काश्मीरमधील तिसरी महत्त्वाची घडामोड मात्र चिंताजनक आहे. अलीकडेच एक सर्वेक्षण प्रकाशित झाले असूून त्यामधून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. जम्मू-काश्मिरमध्ये यावर्षी म्हणजे २०१८ मध्ये १३१ स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांना जाऊन मिळाले असल्याचे हा अहवाल सांगतो. ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. २०००पासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने तरुण दहशतवादाकडे वळले आहेत. २००० मध्ये एकूण ५४ तरुण दहशतवादी संघटनांना जाऊन मिळाले होते. २०१७ मध्ये ही संख्या १२६ होती. मात्र चालू वर्षी जुलै महिन्यापर्यंतच १३१ स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये गेले असतील तर ही वाढ नकारात्मक बाब आहे.
साधारणतः जम्मू काश्मिरचा विचार करता दक्षिण कश्मिरमध्ये प्रामुख्याने सोपिया या जिल्ह्यातील सर्वाधिक तरुण दहशतवादी संघटनांना जाऊन मिळतात. आताही १३१ पैकी ३५ तरुण हे सेपिया जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. हे तरुण दहशतवादाकडे आकर्षित होतात याचा विचार केला तर एक गोष्ट कळते की, जैश ए मोहम्मद, लष्करे तैयब्बा ह्या संघटना त्यांच्या आकर्षणाची केंद्रे आहेत. सध्या मात्र एक नवी संघटना पुढे येते आहे. अन्सार गजवत उल हिंद असे या संघटनेचे नाव आहे. अल कायदा ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ओसामा बिन लादेन याने स्थापन केली होती. अन्सार गजवत उल हिंद ही संघटना ओसामाला मारल्यानंतर गाळात गेलेल्या या संघटनेला बांधील असणारी आहे. या संघटनेला जास्तीत जास्त तरुण जाऊन मिळताहेत. ही संघटना कट्टर इस्लामचे समर्थन करणारी आहे. त्यामुळे हा कट्टरतावाद काश्मिरात आणण्याचे प्रयत्न होताना दिसताहेत. त्याला समर्थनही मिळते आहे. बहुतांश तरुण हे या संघटनेला जाऊन मिळताहेत. त्यामुळे कट्टरतावाद आणि मूलतत्ववादाला नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

बुरहान वाणीला मारल्यानंतर त्याच्यासारखाच एक नवीन चेहरा पुढे येऊ लागला आहे. काश्मिरी तरुणांसाठी बुर्‍हान वणी हा हिरो होता. त्यामुळे त्यााला मारल्यानंतर खूप मोठी निदर्शने जम्मू-काश्मिरमध्ये झाली. त्याच्या पश्‍चात आता झाकीर राशिद भट उर्ङ्ग झाकीर मुसा हा नवा चेहरा समोर आला आहे. अन्सार गजवद अल हिंद या संघटनेचा तो म्होरक्या आहे. तो तरुणांमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय होत आहे. ही बाब नक्कीच गंभीर आहे. काश्मिरातील मूलतत्ववाद वाढणे ही चिंतेची बाब आहे. सीमेवर कुंपण घालून दहशतवाद्यांना थांबवता येईल; पण मात्र स्थानिक स्तरावर लोकप्रिय होणारे दहशतवादी हेदेखील तितकेच विघातक आहेत हे लक्षात घ्यायला हवे. त्याविरोधात पावले उचलावी लागतील. यासाठी मुख्यत्वे करून बेरोजगारीच्या मुद्दयाकडे लक्ष द्यावे लागेल. यासाठी विकासाची गती वाढवावी लागेल. पण दहशतवाद हाच तेथील विकासाचा शत्रू आहे. त्यामुळे दहशतवादाच्या विरोधात कठोर धोरण अवलंबिलेच पाहिजे.