अपघात रोखण्यासाठी पालकांचे मुलांकडे लक्ष हवे : वाहतूकमंत्री

0
179

पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवले व त्यांना रात्री-अपरात्री पार्ट्या व क्लबमध्ये जाण्यापासून रोखले तर आसगाव येथे ज्या प्रकारचा अपघात घडून दोन युवक मृत्युमुखी पडण्याची जी दुर्घटना घडली तशा दुर्घटना होणार नाहीत, असे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करणारे युवक व युवती दारूचे सेवन करून नशेत वेगाने वाहने हाकतात. परिणामी अपघातात सापडून आपले जीव गमावू बसतात. हे सगळे क्लेशदायक आहे. हे अपघातांचे सत्र थांबायचे असेल तर पालकांनाच आपल्या तरूण मुलांकडे लक्ष ठेवावे लागेल असा सूचक सल्ला त्यांनी दिला.