अजमल कसाबला हिंदू ठरवण्याचा होता डाव

0
122

>> राकेश मारिया यांच्या पुस्तकातून खुलासा

मुंबईवर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडल्या गेलेल्या लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अजमल कसाब याला हिंदू ठरवण्यात येणार होते. त्यामुळे कसाबला जर हल्ल्याच्यावेळीच मारून टाकण्यात आले असते तर जगाने त्यावेळी हिंदू दहशतवाद असे या हल्ल्याला मानले असते असा खुलासा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे.

अजमल कसाब हा हिंदू होता आणि २६/११ चा दहशतवादी हल्ला हा हिंदू दहशतवाद होता असे लष्कर ए तोयबाला सिद्ध करायचे होते असा उल्लेख श्री. मारिया यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे.
कसाबच्या हाती हिंदू धर्मातील धागा बांधण्यात आला होता. त्याची ओळख बदलण्यात आली होती. समीर दिनेश चौधरी असे त्याला नाव देण्यात आले होते. लष्कर-ए-तोयबाला २६/११ चा दहशतवादी हल्ला हा हिंदू दहशतवाद्यांनी केला आहे असे सिद्ध करायचे होते. जर त्यावेळी घडलेल्या घटनेत कसाबला जागीच मारण्यात आले असते तर असेच झाले असते असे मारिया यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे. यावरून केंद्रिय मंत्री पीयुष गोयल यांनी कॉंग्रेसविरोधात टीकेची झोड उडवली आहे.

याबाबत बोलताना मंत्री गोयल यांनी, राकेश मारिया यांनी, जेव्हा ते पोलीस आयुक्त होते तेव्हाच त्यांनी हे सत्य जगासमोर आणायला हवे होते. पोलीस सेवेत असताना एखादी माहिती जर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे असेल तर ती त्यांनी सार्वजनिक करायला हवी होती. २६/११ च्या हल्ल्यावेळी एक मोठा कट कॉंग्रेसने रचला होता. कॉंग्रेसने रचलेले कुभांड या पुस्तकामुळे समोर आले असून पी. चिदंबरम यांच्या सांगण्यावरून हिंदू दहशतवाद्यांची एक बोगीच निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता, अशी टीकाही श्री. गोयल यांनी कली आहे.