अखेर महायुती तुटली

0
101

शिवसेना व भाजप या बड्या पक्षांनी समाधानकारक जागा सोडण्यास नकार दिल्याने अखेर काही दिवसांच्या तर्क-वितर्कांनंतर काल शिवसेना-भाजप व मित्रपक्षांची महायुती तुटली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाजपक्ष आणि शिवसंग्राम या तीन पक्षांनी या महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
आता हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढविणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपावरून वाटाघाटी चालल्या होत्या. उभय बाजूंकडून प्रस्ताव देऊनही गुंता सुटत नव्हता. अखेर महायुतीतील अन्य मित्र पक्षांच्या जागा कमी करण्याचा प्रस्ताव शिवसेना-भाजपने समोर आणला. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) व शिवसंग्राम यांना हा प्रस्ताव मान्य न झाल्याने त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व ङ्गस्वाभिमानीफचे नेते सदाभाऊ खोत यांनीच ही माहिती माध्यमांना दिली.